नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळात मोठी भरती

महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळात मोठी भरती
महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ आस्थापनेवरील वरिष्ठ लेखापाल,कनिष्ठ अभियंता ,लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी ),लघु टंकलेखक ,लिपिक टंकलेखक ,गाळणी निरीक्षक ,तांत्रिक सहाय्यक ,अनुरेखक ,जोडारी ,भूमापक ,वाहन चालक ,शिपाई पदे भरण्याकरिता ,पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०१२ आहे.

अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती
नाशिक जिल्हा नगरपरिषदेच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- स्थापत्य (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा –विद्युत (4 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-संगणक (5 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (10 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा- (12 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा (3 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2013 आहे.

अधिक माहिती http://www.nashikexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कृषि आयुक्तालयाअंतर्गत आत्मा योजनेत 25 जागा

कृषि आयुक्तालयाअंतर्गत आत्मा योजनेत 25 जागा
राज्याच्या कृषि आयुक्तालयाअंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील आत्मा योजनेत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (4 जागा), विषय विशेषज्ञ (20 जागा), संगणक आज्ञावली रुपरेषक (1 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 29 डिसेंबर 2012 आहे.

अधिक माहिती http://maharojgar.gov.in/GovtAdvt/Govt_4124.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात १७३ जागा

मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात १७३ जागा
मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य कनिष्ट अभियंता (गट ब)-८४, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट क )-४०, वरिष्ठ लिपिक-१७, कनिष्ठ लिपिक-२८, संगणक (गट क ) - ४ पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०१३ आहे.

अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ३१९६ लिपिकांची भरती

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ३१९६ लिपिकांची भरती
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ३१९६ लिपिकांची पदे भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित झाली असून पात्र उमेदवारांकडून ७ जानेवारी २०१२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहिती https://www.centralbankofindia.co.in/site/MainSite.aspx?status=1&menu_id=17 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दि अमरावती जिल्हा सहकारी बँकेत १०० लिपिकांची भरती

दि अमरावती जिल्हा सहकारी बँकेत १०० लिपिकांची भरती
दि अमरावती जिल्हा सहकारी बँक मर्यादीत अमरावती मध्ये १०० लिपिकांची पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ३१ जानेवारी २०१२ पर्यंत एम.के.सी.एल. मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सुमारे २२००० केंद्रीय पोलिसांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सुमारे २२००० केंद्रीय पोलिसांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Constable (GD) in CAPF & Rifleman in Assam Rifles या पदाकरिता बावीस हजार जागासाठी जाहिरात प्रकाशित झाली असून सदरील अर्ज १५ डिसेंबर २०१२ ते ११ जानेवारी २०१३ या काळात ऑन लाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती http://nmk.co.in/Upload/NMKJID377.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात विविध पदांसाठी थेट मुलाखती

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात महिला नाईट वॉर्डन, संगणक चालक, सुतार, गवंडी, पंप ऑपरेटर, तारतंत्री, नळ कारागिर, कुली, शिपाई ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी थेट मुलाखती दि. 19 डिसेंबर 2012 आहे.
यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharojgar.gov.in/GovtAdvt/Govt_4113.pdf या संगणकावर उपलब्ध आहे.

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये 8 जागांसाठी थेट मुलाखती

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये तांत्रिक अधिकारी-इलेक्ट्रिकल (1 जागा), तांत्रिक सहायक (1 जागा), तंत्रज्ञ (2 जागा), वरिष्ठस्तर लिपिक (1 जागा), वरिष्ठ संशोधन फेलो (1 जागा), तांत्रिक अधिकारी-अभियांत्रिकी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी थेट मुलाखती दि. 18 डिसेंबर 2012 रोजी होणार आहेत.
अधिक माहिती http://icmr.nic.in/icmrnews/ADVERTISEMENT%20-SCALING.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कृषि आयुक्तालयाअंतर्गत आत्मा योजनेत 25 जागा

राज्याच्या कृषि आयुक्तालयाअंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील आत्मा योजनेत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (4 जागा), विषय विशेषज्ञ (20 जागा), संगणक आज्ञावली रुपरेषक (1 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत.

या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 29 डिसेंबर 2012 आहे.
यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharojgar.gov.in/GovtAdvt/Govt_4124.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (6 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2012 आहे.
अधिक माहिती www.ratnagiri.gov.in व https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MPSC States Services Examination New Dates


सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई


२ रा मजला, बांधकाम भवन, २५, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई

जळगाव जिल्हा निवड समिती

जळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील नगरपरिषदांमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (13 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (11 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (11 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (17 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (15 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा (8 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2012 आहे.
सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 5 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.jalgaon.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Social Welfare Officer- Gr-B Syllabus

MPSC द्वारा घेतल्या जाणाऱ्या 20 जानेवारी 2013 च्या नियोजित परीक्षाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.



महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा केला जाणारा हा सन्मान आहे. (ह्याच नावाने इतरही काही संस्था/ वृत्तपत्रे पुरस्कार देतात पण खालील माहिती केवळ महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणार्‍या पुरस्काराशी संबंधित आहे.)
पुरस्काराचे स्वरूप: 5 लाख रुपये रोख , सन्मान पत्र आणि मानचिन्ह
हा पुरस्कार शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात सुरु झाला.
पहिला पुरस्कार महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांना बहाल केला होता.



वर्ष सन्मानार्थी व्यक्ती इतर माहिती
2011 अनिल काकोडकर
क्षेत्र: विज्ञान
  • भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी)चे माजी संचालक
  • अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अणुउर्जा खात्याचे माजी सचिव
2010 जयंत नारळीकर
क्षेत्र:विज्ञान
  • मराठी खगोलशास्त्रज्ञ व लेखक
  • डॉ. फ्रेड हॉयले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी स्थिरस्थिती विश्र्वाचा सिद्धांत मांडला.
  • मराठी विज्ञानकथेचे प्रणेते.
  • खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘आयुका’ (Inter-University Center for Astronomy and Astrophysics) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली.
2009 सुलोचना लाटकर
क्षेत्र: कला, सिनेमा
  • हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंत श्रीमती सुलोचना लाटकर अर्थात सुलोचना दिदी.
  • 250 हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटातून काम.
2008 मंगेश पाडगावकर
क्षेत्र:साहित्य
  • ख्यातनाम मराठी कवी
  • 'सलाम' या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार
2008 नानासाहेब धर्माधिकारी
क्षेत्र: समाज सेवा
  • नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते.
  • त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत कार्य केले.
2007 रा. कृ. पाटील क्षेत्र:लोक प्रशासन
  • गांधावादी.
  • स्वातंत्रपूर्व ICS सेवे द्वारे नागरी सेवा क्षेत्रात प्रवेश.
  • 'नागपूर कराराचा ' मसुदा तयार केला.
  • भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे (Planning Commission) सदस्य होते.
2006 रतन टाटा
क्षेत्र:उद्योग
  • टाटा समूह ह्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे चेअरमन
2005 रघुनाथ अनंत माशेलकर
क्षेत्र:विज्ञान
  • भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य.
  • पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी - एन.सी.एल. (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा)चे माजी संचालक
  • सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे माजी महासंचालक.
  • बौद्धिक ज्ञानसंपादनाच्या हक्काविषयीचे (पेटंट) धोरण याबाबत त्यांचे योगदान मोठे आहे.
2004 बाबा आमटे
क्षेत्र:समाज सेवा
  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली.
  • भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.
  • १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते.
2003 डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग
क्षेत्र: समाजसेवा व आरोग्यसेवा
  • सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात.
2002 भीमसेन जोशी
क्षेत्र: कला,संगीत
  • भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक
2001 सचिन तेंडुलकर
क्षेत्र: क्रीडा
  • क्रिकेटचा देव मानला जाणारा हा महान खेळाडू सध्या राज्यसभेचा सदस्यही आहे.
1999 विजय भटकर
क्षेत्र:विज्ञान
  • सी-डॅकचे संस्थापक व पहिले कार्यकारी संचालक
  • परम कार्यक्रम व लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलचे मदतनीस आणि सल्लागार
1997 लता मंगेशकर
क्षेत्र: कला,संगीत
  • भारताच्या महान गायिका
1996 पु. ल. देशपांडे
क्षेत्र: साहित्य
  • लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक 

Weekly Current Affairs - 3 Dec 2012 to 9 Dec 2012


आंतरराष्ट्रीय

  • फिलीपाइन्समध्ये आलेल्या बोफा वादळातील बळींची संख्या ४७५ वर गेली असून, दोन लाखांहून अधिक नागरिकांना या भीषण वादळाचा फटका बसला आहे
  • एलजी, फिलिप्स, पॅनॉसॉनिक,तोशिबा कॉर्प,सॅमसंग आणि टेक्निकलर ह्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सहा दिग्गज कंपन्यांना युरोपीय आयोगाने तब्बल 10,500 कोटी रुपयांचा (1.47 अब्ज युरो) आर्थिक दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी संगनमत करून कॅथोड-रे ट्यूब्जच्या किमती वाढवल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • नारळाचा स्वाद असलेली अननसाची जगातील पहिली प्रजात ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी तयार केली.
  • संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद कतारमधील दोहा येथे संपन्न.
  • क्योटो प्रोटोकॉलच्या पहिल्या टप्प्याची मुदत 31 डिसेंबर 2012 रोजी संपणार आहे. दुस-या टप्प्याबाबत अजूनही एकमत होऊ शकलेले नाही.
  • मालदीव सरकारने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प भारतीय कंपनीकडून (GMR) काढून घेतल्यामुळे भारत सरकारने मालदीवला दिली जाणारी आर्थिक मदत थांबविली आहे.

राष्ट्रीय

  • उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारने पूर्व उत्तर प्रदेशात कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती स्थापन करण्याच्या योजनेला हिरवा कंदील दर्शवला आहे. कुशीनगर येथे बुद्धमूर्ती स्थापन केली जाणार असून त्यावर जवळपास 1500 कोटी रुपये खर्च येईल,कुशीनगर हे भगवान बुद्धांचे निर्वाणस्थळ आहे
  • केंद्र सरकारने इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी हस्तांतरित करण्याचे संसदेत जाहीर केले.
  • केंद्र सरकारच्या २९ कल्याणकारी योजनांतर्गत अनुदानित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँकखात्यात जमा करण्याच्या रोख हस्तांतर (डायरेक्ट कॅश ट्रान्सफर) योजनेची घोषणा गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांच्या काळात करणे चुकीचे होते, असा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारवर ठेवला आहे. ही घोषणा आचारसंहितेच्या वातावरणास बाधक असल्याचे सांगत या योजनेची गुजरात आणि हिमाचलमध्ये अंमलबजावणी करू नका, असे आदेशही आयोगाने सरकारला दिले
  • कर्नाटकाचे माजी मुख्‍यमंत्री बी एस येडियुरप्‍पांनी केली कर्नाटक जनता पक्षाची स्‍थापना
  • अयोध्येमध्ये बाबरी मशिद पाडल्याला घटनेला २० वर्ष पूर्ण.



प्रादेशिक

  • महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा अजित पवार
    अजित पवार यांनी २५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
  • कोकणातील सहकार क्षेत्रामध्ये गेली सुमारे तेवीस वष्रे पारदर्शी कारभार करीत स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला राज्य शासनातर्फे 'सहकार भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता ('झिम्मा' आत्मकथा), यशवंतराव गडाख ('अंतर्वेध' व्यक्तिचित्रण) व डॉ. महेंद्र कदम ('आगळ' कादंबरी) यांच्या साहित्यकृतींची निवड झाली आहे
  • भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा 'युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी'कडून आंतरराष्ट्रीय 'मंथन' पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आशिया खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार दिला जातो.

  • व्यावसायिक रंगभूमीवर वैशिष्टय़पूर्ण नाटय़मुद्रेचा ठसा उमविणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांना यंदाचा संगीताचार्य बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे
  • ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना यंदाचा 'गदिमा' पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • मराठी साहित्य आणि रंगभूमीवरील बहुआयामी व्यक्तिमत्त्व कै. पु. ल. देशपांडे यांच्या योगदानाच्या स्मृती जागवणारा 'पुलोत्सव' हा बहुरंगी कार्यक्रम येत्या ७ डिसेंबरपासून रत्नागिरी येथे , यंदा त्यामध्ये बुजुर्ग रंगकर्मी विजया मेहता यांना 'पुलोत्सव सन्मान' पुरस्कार.
  • राज्यातील सर्व शाळांना आता मूलभूत सुविधांपासून शिक्षकांपर्यंत सर्व सुविधा देणे बंधनकारक ठरले असून, या सुविधा आहेत किंवा नाही हे तपासून दर तीन वर्षांनी शाळांना मान्यता घ्यावी लागणार आहे. सुविधा न देणार्‍या शाळांना द्रव्य दंडापासून मान्यता रद्द पर्यंतच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.


परिघा पलीकडचे

  • शेतकऱ्याचं आयुष्य आणि ग्रामीण भागातील आरक्षणाचं वास्तव चित्रित करणाऱ्या लेखक आसाराम लोमटे यांच्या 'बेईमान' कथेवर 'सरपंच भगीरथ' हा चित्रपट होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत.
  • फेसबुकने अँड्रॉइड फोनसाठी नवीन संदेश उपयोजन (न्यू मेसेंजर अ‍ॅप) सुरू केले असून, त्याच्या मदतीने फेसबुक खाते नसलेल्यांसह सर्वजण एकमेकांना फोनवरून संदेश पाठवू शकतील व ग्रहण करू शकतील.
  • एसएमएस म्हणजेच लघुसंदेश सुविधेला ३ डिसेंबरला वीस वर्षे पूर्ण

SSC MTS Eligibility Details


SSC MTS Eligibility Details: Staff Selection Commission (SSC) recruits Group ‘C’ posts of Multi Tasking Staff (MTS) in Different States and Union Territories. The following are the eligibility details to apply for the MTS Vacancies…
SSC MTS Eligibility Details:
Nationality: The candidate must be a citizen of India.
Age Limit: The minimum age limit is 18 years and maximum 25 years.
Relaxation of Upper age limit:
Sr.No Category Age Limit in Years
01. SC/ ST 5 years
02. OBC 3 years
03. PH 10 years
04. PH + OBC 13 years
05. PH + SC/ST 15 years
06. Ex-Servicemen (Unreserved / General) 03 years
07. Ex-Servicemen (OBC) 06 years
08. Ex-Servicemen (SC/ST) 08 years
09. Candidates who had ordinarily been domiciled in the State of Jammu & Kashmir(Unreserved/ General) 10 years
10. Candidates who had ordinarily been domiciled in the State of Jammu & Kashmir (OBC) 8 years
11. Candidates who had ordinarily been domiciled in the State of Jammu & Kashmir(SC/ST) 10 years
12. Widows/ Divorced Women/ Women judicially separated and who are not remarried (Unreserved/ General) Up to 35 years of age
13. Widows/ Divorced Women/ Women judicially separated and who are not remarried( OBC ) Up to 38 years of age
14. Widows/ Divorced Women/ Women judicially separated and who are not remarried (SC/ST) Up to 40 years of age
Educational Qualification: Candidate must have passed Matriculation Examination or equivalent from a recognized Board.


Read more: SSC MTS Eligibility Details | FreeJobAlert.com http://www.freejobalert.com/ssc-mts-eligibility/99650/#ixzz2EqUkTyn6

SSC MTS Selection Procedure Details


SSC MTS Selection Procedure Details: Staff Selection Commission (SSC) recruits Group ‘C’ posts of Multi Tasking Staff (MTS) in Different States and Union Territories. The following are the selection procedure details to apply for the SSC MTS Vacancies…
Selection Procedure: Staff Selection Commission Selection Process is based on Written Exam and Interview.
Written Examination: The written exam will consist of (Paper-I) objective type paper and (Paper-II) descriptive type.
(i) Paper-I will consist of Objective Type – Multiple choice questions only. The questions will be set both in English & Hindi, except Part II. There will be negative marking of 0.25 marks for each wrong answer. Paper-II will be held only for such candidates who meet the cut-off prescribed by the Commission in Paper-I for different categories.
(ii) Paper-II will be descriptive in which the candidate will be required to write short essay/letter in English and one language included in the 8th schedule of the Constitution. Paper-II will only be of qualifying nature and is intended to test elementary language skills in view of recategorization of the post as Group-C and in view of job requirements.


Read more: SSC MTS Selection Procedure Details | FreeJobAlert.com http://www.freejobalert.com/ssc-mts-selection-procedure/99665/#ixzz2EqUbYpkN

SSC MTS Exam Pattern Details


SSC MTS Exam Pattern Details: Staff Selection Commission (SSC) recruits Group ‘C’ posts of Multi Tasking Staff (MTS) in Different States and Union Territories. The exam pattern of SSC MTS details given below…
Written Exam: The written examination will consist of (Paper-I) objective type paper and (Paper-II) descriptive type as shown below.
Paper-I:
Part Subject Maximum Mark Total Duration/Timing for General candidates Total Duration/ Timing for Visually Handicapped/ Cerebral Palsy candidates
A General Intelligence & Reasoning (25 Questions) 25 2 Hours
10.00 AM. to 12.00 Noon
or
2:00 PM to
4:00 PM
2 Hours 40 mins
10.00 A.M. to 12.40 PM
or
2:00 PM to 4:40 PM
B Numerical Aptitude (25 questions) 25
C General English
( 50 questions)
50
D General Awareness
(50 questions)
50
Paper-II:
Subject Maximum
Marks
Total Duration /
Timing for General
candidates
Total Duration/
Timing for Visually Handicapped/
Cerebral Palsy candidates
Short Essay / Letter in English and Vernacular Language 50 30 Minutes 45 Minutes
(i) Paper-I will consist of Objective Type – Multiple choice questions only. The questions will be set both in English & Hindi, except Part II. There will be negative marking of 0.25 marks for each wrong answer. Paper-II will be held only for such candidates who meet the cut-off prescribed by the Commission in Paper-I for different categories.
(ii) Paper-II will be descriptive in which the candidate will be required to write short essay/letter in English and one language included in the 8th schedule of the Constitution. Paper-II will only be of qualifying nature and is intended to test elementary language skills in view of recategorization of the post as Group-C and in view of job requirements.


Read more: SSC MTS Exam Pattern Details | FreeJobAlert.com http://www.freejobalert.com/ssc-mts-exam-pattern/99678/#ixzz2EqUEhX74

SSC MTS Syllabus Details


SSC MTS Syllabus Details: Staff Selection Commission (SSC) recruits Group ‘C’ posts of Multi Tasking Staff (MTS) in Different States and Union Territories. The following are the Syllabus details to apply for the SSC MTS Vacancies.
Syllabus:
Paper-I: Questions on ‘General Intelligence and Reasoning’ will be non-verbal considering the functions attached to the post. Questions on Numerical Aptitude and General English will be simple, of a level that an average matriculate will be in a position to answer comfortably. Questions on General Awareness will be also of similar standard.
General Intelligence: It would include questions of non-verbal type. The test will include questions on similarities and differences, space visualization, problem solving, analysis, judgment, decision making, visual memory, discriminating observation, relationship concepts, figure classification, arithmetical number series, nonverbal series etc. The test will also include questions designed to test the candidate’s abilities to deal with abstract ideas and symbols and their relationship, arithmetical computation and other analytical functions.
English Language: Candidates’ understanding of the Basics of English Language, its vocabulary, grammar, sentence structure, synonyms, antonyms and its correct usage, etc. his/her writing ability would be tested.
Numerical Aptitude: This paper will include questions on problems relating to Number Systems, Computation of Whole Numbers, Decimals and Fractions and relationship between Numbers, Fundamental arithmetical operations, Percentages, Ratio and Proportion, Averages, Interest, Profit and Loss, Discount, use of Tables and Graphs, Mensuration, Time and Distance, Ratio and Time, Time and Work, etc.
General Awareness: Questions will be designed to test the ability of the candidate’s general awareness of the environment around him and its application to society. Questions will also be designed to test knowledge of current events and of such matters of everyday observation and experience in their scientific aspects as may be expected of an educated person. The test will also include questions relating to India and its neighbouring countries especially pertaining to Sports, History, Culture, Geography, Economic scene, General Polity including Indian Constitution, and Scientific Research etc. These questions will be such that they do not require a special study of any discipline.
NOTE: For VH candidates of 40% and above visual disability and opting for SCRIBE there will be no component of Maps/Graphs/Diagrams/Statistical Data in the General Intelligence & Reasoning / General Awareness Paper.
Paper-II: The Paper will be set in English and Hindi to test basic language skills commensurate with the educational qualification prescribed for the post. Candidates will be required to write one short essay/letter in English and Hindi each. Candidates can opt to write the essay/letter in any Indian language listed in 8th Schedule of the Constitution in lieu of Hindi.


Read more: SSC MTS Syllabus Details | FreeJobAlert.com http://www.freejobalert.com/ssc-mts-syllabus/99691/#ixzz2EqTtJIJM

राज्यसेवा परीक्षा - बदलेले स्वरूप


पूर्व आणि मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात झालेला हा बदल खरे तर अनपेक्षित नव्हताच. आयोगाने परीक्षा पद्धतीत आणि प्रश्नांच्या साचेबद्ध बांधणीत केलेले बदल, STI आणि सहायक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमात त्या पदाला आवश्यक असलेल्या किमान सामान्य ज्ञानाशी सुसंगत असे बदल आणि त्या नंतर राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रम, पद्धतीत केलेले आमूलाग्र बदल ह्या पार्श्वभूमीवर हे सर्व अपेक्षितच होते. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस च्या पूर्व परीक्षेसाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी केलेले बदल ह्या सगळ्यांचा प्रभाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या अभ्यासक्रम बदलावर पहावयास मिळतो.

ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वेगळ्या स्वरुपाची मानसिकता तयार करणे महत्त्वाचे ठरेल. आता आपण सविस्तरपणे हे सर्व अभ्यासुया.ज्या मित्र-मैत्रिणींनी आताच MPSC परीक्षा द्यायला सुरुवात केली आहे, त्यांना विचारात घेवून अगदी मुलभूत बाबींपासून सर्व समजावून घेवू या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC दरवर्षी PSI, STI, मंत्रालय सहायक (Asst) आणि राज्यसेवा परीक्षा (State Services) अशा वेगवेगळ्या परीक्षा घेत असते. शिवाय सरळ सेवा भरती ने काही पदांसाठी परीक्षा घेते. पैकी राज्यसेवा परीक्षेद्वारे विशेष महत्त्वाची अशी पदे भरली जातात. या परीक्षेद्वारे उप-जिल्हाधिकारी(Deputy Collector),पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (Dy.SP/ACP),सहायक विक्रीकर आयुक्त (Asst.Commissioner Sales Tax),तहसीलदार,उपनिबंधक सहकारी संस्था (DDR),उपमुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी(Dy CEO/BDO),महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा ह्या गट-अ म्हणजे वर्ग-1 च्या पदांशिवाय वर्ग-2 च्या बऱ्याच महत्त्वपूर्ण पदांसाठी हि सामाईक परीक्षा घेतली जाते.
MPSC राज्यसेवा परीक्षेचे (State Services)स्वरूप
राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 3 टप्प्यातून जावे लागते.
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा -400 गुण
2. राज्यसेवा मुख्य परीक्षा -800 गुण
3. मुलाखत -100 गुण

पूर्व परीक्षा ही चाळणी म्हणून वापरली जाते. साधारणपणे एकूण उपलब्ध पद संख्येच्या 13 पट उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी त्यांच्या पूर्व परीक्षेतील 'परफॉर्मन्स' च्या आधारे पात्र म्हणून घोषित केले जाते. बाकीच्या उमेदवारांना पुढील जाहिराती साठी वाट पाहणे भाग पडते. मात्र पात्र उमेदवारांसाठी पूर्व परीक्षेचे गुण हे 'Qualifying' म्हणून धरण्यात येतात. म्हणजेच ह्या गुणांना अंतिम निकालात स्थान नसते.

मुख्य परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे साधारणत: 3 ते 5 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. बाकी उमेदवारांसाठी साप-शिडीच्या खेळातील सापाने गिळल्यानंतर जसे सुरुवातीला जावे लागते तसेच पुन्हा पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते. मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील एकूण गुण संख्येच्या आधारे अंतिम शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होते. बाकीच्या दुर्दैवी उमेदवारांना साप-शिडीच्याच खेळाचा नियम लागू होतो, म्हणजे पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात. उमेदवारांनी मुलाखती पूर्वी दिलेले पसंतीक्रम आणि वर्गवारीनिहाय(Categorize-wise)त्यांचे अंतिम गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्या वर्गवारीसाठी उपलब्ध असलेल्या जागा यांच्यावरून पदनिहाय यादी तयार केल्या जातात.

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम

ह्या सुधारित अभ्यासक्रमाने अनुभवी आणि नवीन उमेदवारांना एकाच पातळीत आणून ठेवले.पूर्वीच्या अभ्यासक्रमात पाठांतरावर मोठी भिस्त होती. मात्र आता नवीन पॅटर्न नुसार पूर्व परीक्षेत दोन पेपर असतील. पैकी एक पेपर पारंपारिक घटक म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, भारतीय राज्यपद्धती, भारतीय अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांचा समावेश आहे. अर्थात आयोगाने अलीकडे घेतलेल्या परीक्षांचा विचार केला तर हा पेपर ही त्या त्या विषयातील चालू घडामोडींचा सखोल अभ्यास केल्याशिवाय चांगल्याप्रकारे सोडवता येणे शक्य नाही. आम्ही या तयारीत तुम्हाला मदत व्हावी या साठीच हा ब्लॉग www.mpsccurrent.blogspot.in चालवत आहोत.
अर्थात नवीन पॅटर्न नुसार चालू घडामोडींचा सखोल अभ्यास आणि पेपर -2 ची नेमकी तयारी ह्या बाबी मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी 'deciding factor' ठरतील. पेपर-2 चा विचार करता काही विद्या शाखेच्या (उदा.इंजिनियरिंग) विद्यार्थ्यांना नक्कीच थोडे मार्जिन आहे. अर्थात इतरांनी ना-उमेद होण्याचे काहीही कारण नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या पूर्व परीक्षेचे गुण अंतिम गुणांत धरले जात नाहीत. आणि व्यवस्थित अभ्यासाने पेपर-2 मध्ये चांगले गुण घेणे कोणालाही शक्य होईल.

लवकरच आम्ही येथे पेपर -1 आणि पेपर -2 ची तयारी कशी करावी आणि संदर्भसाहित्य याविषयी सविस्तरपणे लिहू. तूर्तास येथेच थांबू यात.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात 10 जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 
नेफ्रोलॉजिस्ट (1 जागा), 
फिजिशियन/वैद्यकीय अधिकारी (1 जागा),
डायलिसिस टेक्निशियन (3 जागा), 
स्टाफ नर्स (3 जागा), 
युनिट अटेंडंट (2 जागा) 
ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2012 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 1 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO)

माटुंगा, मुंबई - ४०० ०५१

टीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरावा, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

इंडो तिबेटन बोर्डर पोलीस फोर्स (ITBP)

INDO TIBETAN BORDER POLICE FORCE


टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

महाराष्ट्र भूजल एमपीएससीतर्फ उपअभियंत्यांच्या 16 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या
महाराष्ट्र भूजल सेवा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, 
गट-अ मधील उप अभियंता - यांत्रिकी (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2012 आहे.
अधिक माहिती www.mpsconline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये बस वाहकाच्या 1170 जागा

(बेस्ट)  बस वाहक (1170 जागा) भरण्यात येणार आहेत. 
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2012 आहे.
अधिक माहितीसाठी  जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मागोवा - 24 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2012


  • माजी विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर यांचे निधन .
    • कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी या गावाच्या सरपंच पदावरून राजकीय कारर्किदीची सुरुवात .
    • कोल्हापूर जि. प. वर काम पाहीले .
    • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार .
    • गडहिंग्लज मतदारसंघातून .
    • 2005 साली विधानसभा अध्यक्ष.
    • राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहीले .
    .

  • प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन .
    • चित्रपट: चौकट राजा , आनंदाचं झाड , सातच्या आत घरात , तू तिथं मी .
      ' सुखान्त ' हा त्यांचा चित्रपट इच्छामरणाचा विषय हाताळणारा होता .
    • मालीका: अवंतिका , सुकन्या . .

  • हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी , थोर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ताराबाई परांजपे यांचे निधन .
  • उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांचा राजीनामा .
    अजित पवार यांनी वित्त व नियोजन मंत्री आणि ऊर्जामंत्री पदाचाही राजीनामा दिला .









  • भारताच्या 39 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती अल्तमश कबीर यांची नियुक्ती .



    • या पूर्वी झारखंड आणि कोलकता या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्तीपद त्यांनी भूषविले .
    • न्यायमूर्ती एस. एच. कपाडिया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले त्या जागी कबीर यांची नियुक्ती करण्यात आली .
  • 27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन .
  • विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री: सी. पी. जोशी
  • केंद्रीय अर्थमंत्री: पी. चिदंबरम
  • मुंबई महानगरपालिका स्वतः 20 MW क्षमतेचा विद्युतनिर्मीती प्रकल्प उभा करणार आहे . मोरबे धरणाच्या 100 एकर जमीनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे .
  • केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( CBI ) 1993 पासूनच्या कोळसा खाण वाटपाची चौकशी करणार.
  • राज्यात 4 हजार 637 ग्रामपंचायतीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार.
  • भारताचा आजतागायताचा सर्वात जास्त ( 3 हजार 400 किलो ) वजनाच्या GSAT - 10 ह्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण .
    • ' गगन ' साठी हा उपग्रह उपयुक्त असेल . शिवाय - प्रगत दळणवळणासाठी उपयोगी
    • दक्षिण अमेरिकेतील ' फ्रेंच गियाना ' इथल्या युरोपीय प्रक्षेपण तळावरून तो प्रक्षेपित करण्यात आला .





  • राष्ट्रीय व्यवस्थापन परिषद मुंबईत संपन्न.



  • चोवीसावे ' अखिल भारतीय मराठी बालकुमार साहीत्य संमेलन ' डिसेंबर 2012 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी ता. राजापूर येथे होणार आहे .


  • संयुक्त राष्ट्र संघटनेचे ' जैवविविधता ' ( Biodiversity ) ह्या विषयावरील जागतिक परिसंवाद हैदराबादेत संपन्न .
    • केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री :जयंती नटराजन



  • राज्यात 2 ऑक्टोबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2012 या कालवधीत ' महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जागृती अभियान ' राबविले जाणार .
    • स्वयंपूर्ण ग्राम राज्याची उभारणी हा महात्मा गांधीचा संकल्प होता . त्या दृष्टीने हे अभियान राबविले जाणार आहे .

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती .


  • सत्ताविसावा ' इंदीरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ' कवी गुलजार यांना जाहीर . 31 ऑक्टोबरला म्हणजे इंदीरा गांधींच्या स्मृतीदिनी तो त्यांना प्रदान केला जाईल 
  • जिल्हा परिषद, बुलढाणा

    Buldhana Zilha Parishad, Buldhana

    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संपूर्ण जाहिरात वाचावी.

    औरंगाबाद कारागृह, औरंगाबाद

    कारागृह उपमहानिरीक्षणालय, मध्य विभाग, औरंगाबाद
    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संक्षिप्त जाहिरात वाचावी.

    Artillery Records, Nasik

    तोफखाना अभिलेख, नाशिक, Artillery Records, Nasik Road Camp, Nasik - 422 102

    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संपूर्ण जाहिरात वाचावी. Please read detail advt.carefully

    रयत शिक्षण संस्था, सातारा

    Rayat Shikshan Sanstha, Satara. Karmaveer Samadhi Parisar, Near Powai Naka, Dist: Satara - 415 001

    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता M.K.C.L. केंद्रावर संपर्क करावा, M.K.C.L. केंद्राची यादी संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

    माझगांव डॉक लिमिटेड - 834 Post

    माझगांव डॉक लिमिटेड - 834 Post
    Mazgaon Dock ltd. Dockyard Road, Mazgaon, Mumbai - 400010


    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संक्षिप्त जाहिरात वाचावी. Please read detail advt.carefully

    नागपूर कारागृह, नागपूर

    कारागृह उपमहानिरीक्षक, पूर्व विभाग, नागपूर.
    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संक्षिप्त जाहिरात वाचावी.

    Bank Of Maharashtra


    Bank Of Maharashtra


    H.O.'Lokmangal', 1501, Shivaji Nagar, Pune-411005


    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संक्षिप्त जाहिरात वाचावी. Please read detail advt.carefully.

    जाहिरातीशिवाय नोकरभरती अन्याय्य - न्यायालय

    नवी दिल्ली - सरकारी कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी जाहिरात दिल्याशिवाय सरकार भरती करू शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. ज्या जागांसाठी जाहिरात दिली असेल, त्याच जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

    न्यायमूर्ती ए. कबीर आणि एस. एस. निज्जर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. "जाहिरात दिलेल्या जागांसाठी अर्ज न करणारे उमेदवार इतर रिक्त जागांसाठी- ज्यांची जाहिरात देण्यात आलेली नाही- उत्सुक असू शकतात. त्यामुळे सर्व सरकारी रिक्त जागांची माहिती सर्वांना मिळण्याची व्यवस्था केल्याशिवाय भरती करणे अन्यायकारक असेल,' असे या निकालपत्रात नमूद करण्यात आले. भूमिअभिलेख विभागातील 690 जागा रिक्त ठेवण्याचा आसाम सरकारचा निर्णय न्यायालयाने रद्द ठरविला. यातील केवळ 160 जागांसाठीच जाहिरात देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. या 160 जागांसाठी 560 उमेदवार निवडले गेल्याने उर्वरित जागाही याच उमेदवारांमधून भरण्याचा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती.

    सकाळ वृत्तसेवा