नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र भूजल एमपीएससीतर्फ उपअभियंत्यांच्या 16 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या
महाराष्ट्र भूजल सेवा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, 
गट-अ मधील उप अभियंता - यांत्रिकी (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2012 आहे.
अधिक माहिती www.mpsconline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये बस वाहकाच्या 1170 जागा

(बेस्ट)  बस वाहक (1170 जागा) भरण्यात येणार आहेत. 
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2012 आहे.
अधिक माहितीसाठी  जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मागोवा - 24 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2012


  • माजी विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर यांचे निधन .
    • कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी या गावाच्या सरपंच पदावरून राजकीय कारर्किदीची सुरुवात .
    • कोल्हापूर जि. प. वर काम पाहीले .
    • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार .
    • गडहिंग्लज मतदारसंघातून .
    • 2005 साली विधानसभा अध्यक्ष.
    • राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहीले .
    .

  • प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन .
    • चित्रपट: चौकट राजा , आनंदाचं झाड , सातच्या आत घरात , तू तिथं मी .
      ' सुखान्त ' हा त्यांचा चित्रपट इच्छामरणाचा विषय हाताळणारा होता .
    • मालीका: अवंतिका , सुकन्या . .

  • हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी , थोर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ताराबाई परांजपे यांचे निधन .
  • उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांचा राजीनामा .
    अजित पवार यांनी वित्त व नियोजन मंत्री आणि ऊर्जामंत्री पदाचाही राजीनामा दिला .









  • भारताच्या 39 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती अल्तमश कबीर यांची नियुक्ती .



    • या पूर्वी झारखंड आणि कोलकता या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्तीपद त्यांनी भूषविले .
    • न्यायमूर्ती एस. एच. कपाडिया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले त्या जागी कबीर यांची नियुक्ती करण्यात आली .
  • 27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन .
  • विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री: सी. पी. जोशी
  • केंद्रीय अर्थमंत्री: पी. चिदंबरम
  • मुंबई महानगरपालिका स्वतः 20 MW क्षमतेचा विद्युतनिर्मीती प्रकल्प उभा करणार आहे . मोरबे धरणाच्या 100 एकर जमीनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे .
  • केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( CBI ) 1993 पासूनच्या कोळसा खाण वाटपाची चौकशी करणार.
  • राज्यात 4 हजार 637 ग्रामपंचायतीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार.
  • भारताचा आजतागायताचा सर्वात जास्त ( 3 हजार 400 किलो ) वजनाच्या GSAT - 10 ह्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण .
    • ' गगन ' साठी हा उपग्रह उपयुक्त असेल . शिवाय - प्रगत दळणवळणासाठी उपयोगी
    • दक्षिण अमेरिकेतील ' फ्रेंच गियाना ' इथल्या युरोपीय प्रक्षेपण तळावरून तो प्रक्षेपित करण्यात आला .





  • राष्ट्रीय व्यवस्थापन परिषद मुंबईत संपन्न.



  • चोवीसावे ' अखिल भारतीय मराठी बालकुमार साहीत्य संमेलन ' डिसेंबर 2012 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी ता. राजापूर येथे होणार आहे .


  • संयुक्त राष्ट्र संघटनेचे ' जैवविविधता ' ( Biodiversity ) ह्या विषयावरील जागतिक परिसंवाद हैदराबादेत संपन्न .
    • केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री :जयंती नटराजन



  • राज्यात 2 ऑक्टोबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2012 या कालवधीत ' महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जागृती अभियान ' राबविले जाणार .
    • स्वयंपूर्ण ग्राम राज्याची उभारणी हा महात्मा गांधीचा संकल्प होता . त्या दृष्टीने हे अभियान राबविले जाणार आहे .

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती .


  • सत्ताविसावा ' इंदीरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ' कवी गुलजार यांना जाहीर . 31 ऑक्टोबरला म्हणजे इंदीरा गांधींच्या स्मृतीदिनी तो त्यांना प्रदान केला जाईल